जगभरात सर्वात जास्त कांदा महाराष्ट्रातून निर्यात होतो. मात्र केंद्र सरकारचं निर्यात धोरण कांदा उत्पादक शेतक-यांना मारक ठरतंय. वारंवार आंदोलनं झाली मात्र तरीही केंद्र सरकारनं याकडे दुर्लक्ष केले. आज पुन्हा लासलगावमध्ये आंदोलन झालं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात याचे पडसाद उमटले.
